पोस्ट्स

निसर्गाचे अमूल्य वरदान🌻🌾🌿🌱

इमेज
https://youtube.com/shorts/hMHf41H0sBA?si=oBGiutAHBIb2JekR   आयुर्वेदातील 10 औषधी वनस्पती – निसर्गाने दिलेले आरोग्याचे अमूल्य वरदान आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारपद्धतींकडे वळताना दिसतात. भारतातील प्राचीन वैद्यकीय शास्त्र म्हणजे Charaka Samhita आणि आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले आहे. या वनस्पती शरीर, मन आणि रोगप्रतिकारशक्ती यासाठी उपयुक्त मानल्या जातात. या लेखात आपण आयुर्वेदातील 10 महत्त्वाच्या औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेऊ. 1. Tulsi – औषधी गुणांची राणी तुळस ही आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. फायदे: ✔ सर्दी, खोकला कमी करण्यास मदत ✔ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत ✔ पचन सुधारण्यास मदत ✔ तणाव कमी करण्यास मदत कसे घ्यावे? तुळशीची पाने चावून खाऊ शकता किंवा चहा बनवून घेऊ शकता. 2. Neem – त्वचा आणि रक्तशुद्धीसाठी उपयुक्त कडुनिंबाला आयुर्वेदात विशेष स्थान आहे. फायदे: ✔ त्वचेच्या समस्यांमध्ये मदत ✔ रक्तशुद्धीसाठी उपयोगी ✔ केसांसाठी उपयुक्त ✔ जंतुनाशक गुणधर्म 3. Aloe Vera – त्वचा आणि पचनासाठी लाभदा...

माझा शेवगा.... आरोग्याचा नैसर्गिक खजिना🌿🌿🌿

इमेज
शेवगा ....... निसर्गाचे अमूल्य वरदान तसेच .... शेवगा शेंगाचे आरोग्यदायी फायदे ......✍️✍️✍️✍️✍️   आजच्या धावपळीच्या जीवनात नैसर्गिक आणि पौष्टिक अन्नाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेल्या भाज्यांमध्ये शेवगा शेंगा विशेष स्थान राखते. आयुर्वेदात शेवग्याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. शेवगा ही केवळ भाजी नसून, शरीरासाठी निसर्गाने दिलेले एक अमूल्य वरदान मानले जाते. 🌿🌿शेवगा म्हणजे काय ? Drumstick (Moringa) ही एक औषधी वनस्पती आहे.  याची शेंग, पाने, फुले आणि बिया—सर्वच भाग उपयोगी  असतात. भारतात विशेषतः महाराष्ट्रात शेवग्याचा वापर भाजी आमटी, सूप आणि घरगुती उपायांमध्ये केला जातो. शेवगा शेंगामध्ये असलेले पोषक घटक शेवग्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात: कॅल्शियम.... आयर्न.... प्रोटीन.... फायबर.... व्हिटॅमिन A.... व्हिटॅमिन C.... पोटॅशियम.... हे घटक शरीराच्या एकूण आरोग्यास मदत करतात. शेवगा शेंगाचे 10 महत्वाचे फायदे ........... १ ) रोग प्रतिकारक शक्ती वाढवते ...... शेवग्यातील व्हिटॅमिन C शरीराची immunity मजबूत करण्यास मदत करते. २) हाडे मजबूत ठेवते.....  ह...

होय खरचं आहे हे ...🤔 पण नेमकं काय

इमेज
*स्वयंपाकघरातूनच तुमच्या शरीरात शिरतंय विष, आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर..... मग चौथी गोष्ट आहे तरी काय...*           प्लॅस्टिक मुळे महासागरात  होणारे दुष्परिणाम हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्लास्टिक हे आपल्या सर्वांच्या  आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी प्लास्टिकच्या  बॉटलमधून पाणी पिण्यापासून ते प्लास्टिक कंटेनरमधून  आलेले पार्सल खाण्यापर्यंत सर्वच गोष्टीत आपण प्लास्टिकचा  वापर करत असतो. मात्र आता हेच प्लास्टिक  मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आपल्या अन्नातून, पाण्यातून  आणि अगदी श्वासावाटेही शरीरात प्रवेश करत असल्याचे  धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे  आपले स्वयंपाकघर हे या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे सर्वात मोठे  स्त्रोत ठरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे टाळणे हे कठीण  आहे. मात्र आपण काही दैनंदिन सवयीत बदल करुन त्याचा  धोका नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिकच्या भांड्यांना  उष्णता लागल्यास किंवा प्लास्टिक बोर्डवर अन्न काप...

आयुष्याच्या धावपळीत हरवलेलं सुख... होय माझं हे राहूनच गेलं....

इमेज
 ✍🏻✍🏻✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ लेखन प्रपंच का .... तर माझं काही राहून गेलय का ? *जगायचं राहून गेलं नाही पाहिजे... होय योग्य च वाचत आहात तुम्ही आपलं जगायचं राहून जातय आणि याला कारणीभूत म्हणजे आपण स्वतःच बरका मित्रांनो .* दैनंदिन जीवनात आपण खरचं जगतोय का 😔 क्षणभंगूर जीवनामध्ये ह्या आपण किती दिवसांचे पाहुणे आहोत आणि आपली कधी विकेट आपली जाईल याची काहीचं खबर नाही कोणालाचं.🤔 आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात,बऱ्याचं वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच पर्मनंट नाही मित्रानो...* आज आहे तर उद्या नाही.शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीचं राहतात. खर पाहायचं म्हटलं तर कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है यानुसार पैसा नौकरी कुटूंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता उभं आयुष्य मात्र तसचं राहतं आणि सर्व सुखे मिळतात पण स्वच्छंदी .जगायचे मात्र तसेच राहते....... I am Happy feeling.... म्हणून माणूस म्हणून जगताना प्रत्येक व्यक्ती ने जगून घ्यावं,बोलून घ्यावं मनमुराद हासून घ्यावं,आलंच रडायला तर रडूनही घ्यावं....    रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलुन सुरुवात करू...

नमस्कार करतो.... अरे नको नको

इमेज
            जूनं ते सोनं पण ते का सोनं आहे ? त्यामागे काही रहस्य दडले आहे का ?  मग ते जुनं काहिही असो एखादी वस्तू एखादी रुढी परंपरा  किंवा एखादी सवय सूद्धा असू शकते आता त्यातील एक  आपली संस्कृती आहे कि वडिल मंडळीच्या पाया पडणे त्यांना  नमस्कार घालणे पण त्यातही आधुनिकीकरण दिसत आहे .  म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि एखादा नमस्कारासाठी  खाली वाकला कि तो वयाने लहान झाला आणि नमस्कार  करून घेणारा मात्र अप्रत्यक्षपणे मोठा झाला आणि याचाच तर  कमीपणा वाटतो का कि आजून काही .... आता स्वार्थी  असलेल्या पिढीने हे जाणायला हवे कि नमस्कार केला कि  समोरच्या व्यक्तीला आशिर्वाद द्यावा लागतो मग हा आशिर्वाद  नको का आपल्याला.... आता यावरील एक प्रसंग पाहूया.... नमस्कार करतो -.... मी नको नको की कल्याणमस्तु? “ नमस्कार करतो  ..... ”  “ अरे नको नको..... ” आपल्या रोजच्या आयुष्यातला हा संवाद किती सहज, किती ओळखीचा. पण कधी थांबून आपण विचार केलाय का — “नको नको” म्हणताना आपण नेमकं काय नाकारतो आहोत? आशिर्वादात खूप ताकद असते....

माझ्यातील मी 😔

  *मला वाटायचे की नोकरी *करणाऱ्या स्त्रिया खूपच सुखी असतात ,आनंदी असतात ,पण*  *खरं पहायला गेले तर तसे नसते.*आपल्याला दिसते ते चित्र खूपच वेगळे असते आणि वास्तविकता खूपच वेगळी असते . तिचे वास्तव हे तिने जगापासून लपवून ठेवलेले असते . नावाला असलेली  नोकरी हे फक्त देखाव्यापूर्ती .  तिथे होणारी मानसिक कुचंबणा ,,,,वरिष्ठांकडून होणारा त्रास,,,, आणि आपली बाजू कोणी ऐकून घेत नाही याची मनाला लागलेली रुखरुख... त्यातच स्वाभिमानी असलेल्या स्त्रियांसाठी या  सर्व गोष्टी तिच्या काळजाचे तुकडे तुकडे करत असतात. हा प्रसंग मात्र नेहमीच ठरलेला असतो. यात कधी चढ कधी उतार मात्र  आपल्याला पाहायला मिळेल😊  सहकारी जेव्हा पुरुष असतो तेव्हा तो मात्र वरिष्ठाला भेटून आपली बाजू मांडू शकतो . वेळोवेळी त्याला जे हवे ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसलाही धक्का न लागू देता त्या स्त्रियांबद्दल काहीही बोलतो आणि स्वतःला जसा अर्थ घ्यायचा अशा पद्धतीने घेऊन तो तिला मात्र चुकीचे ठरवण्यात मागेपुढे कसलीही कसर सोडत नाही. असेच मला अवतीभोवती जाणवते . अशा प्रकारचे वातावरण प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. त्या...

आयुष्यातील साथी.. सुख दुःख

 सुख-दुःख : जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊया सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन अविभाज्य भाग आहेत. सुख-दुःखाचा अर्थ, त्यांचे महत्त्व आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन कसे जगावे याबद्दल सविस्तर माहिती. प्रस्तावना जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचा सुंदर संगम. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात तसेच कठीण प्रसंगही येतात. पण खरं पाहिलं तर सुख-दुःख हे दोन्हीही आपल्या आयुष्याला घडवणारे शिक्षक आहेत. आणि आपण घडतो पण . सुख म्हणजे काय? सुख म्हणजे मनाला समाधान मिळणे. ते मोठ्या गोष्टींमध्येच असते असे नाही – कुटुंबासोबत घालवलेला वेळ एखादे छोटे यश आपले आरोग्य चांगले असणे मनःशांती मिळणे सुख हे बाहेर नसून आपल्या मनात असते. दुःख का येते? दुःख हे अपयश, अपेक्षाभंग, नात्यातील तणाव किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे येऊ शकते. पण दुःख कायमस्वरूपी नसते. जसे रात्र गेल्यावर दिवस येतो, तसेच दुःखानंतर सुख येते. दुःख आपल्याला शिकवते: संयम सहनशक्ती जीवनाची खरी किंमत स्वतःची ताकद ओळखणे सुख-दुःखाचे संतुलन का आवश्यक आहे? जर आयुष्यात फक्त सुखच असते तर त्याची किंमत कळली नसती. दुःखामुळेच सुख अधिक मौल्यवान वाटते. जीवनातील प्रत्येक...